ही फिल्म बनविण्यात ३०० माणसांनी आपले रक्त आटवले आहे. त्यांचा विचार करून फिल्म रिलीज होऊ द्यावी, असे म्हणणारा करण जोहर जनतेला मूर्ख समजतो की काय? त्या सर्व लोकांचे पेमेंट आधीच झालेले असते. त्यांचे काहीच नुकसान होणार नाहीय. तसे तर त्या पाकिस्तानी फवादचेही पैसे पोचलेच असतील. पण भारतीय जनतेच्या बहिष्कारामुळे आता त्याची व्हॅल्यू कमी होऊन त्याचे नुकसान होणारच. सर्वात चांगली अद्दल घडणार पाकिस्तानी कलाकाराला संधी देणाऱ्या करण जोहरचे!